Friday, 23 September 2016

तरीही नद्या दुषित का ?

आकाशातल्या मेघांना
प्रश्न एक भेडसावतो
आम्ही तर पृथ्वीवर
 शुद्ध पाणीच पाठवतो
तरीही नद्या दुषित का
 विषाक्त का ?

त्यांना मुळी माहीत नसतं
माणसानं  औद्योगिक प्रगती  केली.
प्रचंड कारखाने उभारले
दिवस रात्र चालतात ते
त्यातली रसायने,मैला
याच नद्यातून वाहातो
त्याने पाणी विषारी होतं
दुषित होतं.

जीव  देणारं  मूळचं पाणी
जीव  घेणारं बनतं
माणसाचं सान्निद्य
इतकं भयानक असतं
याची मेघांना ओळख असती
तर त्यांनी मुकाट्याने
वर्षानुवर्षे अनादि काला पासून
पृथ्वीवर शुद्ध पाण्याची शिंपण
केलीच नसती.

No comments:

Post a Comment