Thursday, 22 September 2016

आता मात्र सारेच बदलले--

झुंजूमुंजू होताच लखकन डोळे उघडायचे
प्रातःस्मरण व्हायचं.शौच्य,स्नान आटोपून
गीता पठन व्हायचं.
न्याहरी,नास्ता होऊन वाचन,चिंतन,मनन
लेखन ,रोजचा परिपाठ,व्यायाम,योगासने.

आता मात्र ,सारेच बदलले.
डोक्यावर सूर्य येतो,तेव्हां कुठे डोळे उघडतात.
सी डी  किंवा  क्यासेट  वाजत  असते.
प्रातःस्मरण,नाम जप,भजन,कीर्तन'साऱ्या साऱ्या
ध्वनिफिती, चित्रफिती.टीव्हीच्या पडद्यावर
नाना चित्रे,,प्रवचने,बातम्या,सत्संग,उद्बोधन
नाटके,सिनेमे,तमाशे.चर्चा,वार्तापत्रे,कथा,कविता,
पुस्तके जागतिक माल मसाला.जाहिरातींचा खच
काय नसते?

घरांचं घरपण संपल.घरे होम थिएटरस् झालीत
चहा नास्ता,जेवण टीव्ही पुढेच
एकमेकाशी बोलणं नाही चालणं नाही.संवाद
मुळीच नाही.
म्हणूनच जीवनात सु संवाद राहिला नाही.
उरली ती औपचारिकता,स्नेहशून्य सहानुभूती

माणुस आत्ममग्न स्वतःच्या विश्वात स्वतः भोवती
फिरतोय गिरक्या घेत.
बेफिकिर,बेदरकार,बेफाम,बेलगाम,स्वच्छंदपणे
भौतिक सुखाची वाढतेय लालसा.
हे हवं ते हवं हाव काही संपत नाही,स्थैर्य नाही
अतृप्त समंध तृप्त 'होत नाही.होणार नाही.
सुख,शांती,समाधान काही काही मिळत नाही
मिळनार नाही
धावणं माणसाचं संपणार नाही लक्ष्यपूर्ती
होणार नाही
युगधर्म हा पाळायलाच हवा.नाहीतर स्पर्धेतून
केव्हा बाद केलं जाईल
हीच भीती भेडसावते.य

No comments:

Post a Comment