Wednesday, 21 September 2016

मुखवटा मात्र सर्वोदयी ----

जात,जमात, संप्रदाय
संकुचित विचारधारा
कल्याणकारी राज्य हे
लक्ष्य आमचे.
म्हणत म्हणत
जात,जमात,संप्रदाय
यांचाच आधार घेऊन
मतांची लढाई जिंकतात

जिंकल्यावर जात,जमात,
संप्रदाय ,धर्म निरपेक्ष
तत्वांचा विजय म्हणून
गाजावाजा केला जातो.

प्रत्यक्षात
जातीची ,जमातीची ,संप्रदायाची,
आपल्याच अनुयायांची
शक्ती कशी वाढेल
याकडेच लक्ष ठेवून योजना
आखत असतात.

मुखवटा मात्र सर्वोदयी
धारण करून
सत्य, अहिंसेसाठी
झटतोय म्हणून
त्यांच्या विजयासाठी
असत्य,हिंसा, क्रौर्य वा
प्रतिशोधाचाच मार्ग
चोखाळतांना दिसतात.

उक्ती व कृतीतलं अंतर
सारखं वाढतंय नाही का?

No comments:

Post a Comment