Friday, 7 October 2016

असेच सारे चालत असते----

आयाराम,गयाराम
यांचे कुणाला
सोयरसुतक नसते
निवडणुकपूर्व
तिकिटासाठी
भल्या भल्यांचे
नाटक असते

खुनी,भ्रष्टाचारी
यांना दिवस बरे आले
सारेच पक्ष निवडणुकीत
त्यांची मदत घेतांना
दिसतात.

निवडणुक लढाई असते
तीत सारं क्षम्य असतं.
तत्वच्युती ,अधःपात
लक्ष्यापासून  दूर जाणं
तत्वांना तिलांजली देणं
सारं शिष्टसंमत असतं
विजयासाठी हवं तसं,
स्वतःला फिरवणं
हीच शिस्त असते.

जनमताचा अर्थ
सोयीनुसार लावला जातो
कौल आमच्याच
बाजूचा म्हणणे
सारे खोटेअसते.
खोटेच दडपून खरे आहे
असेच सारे
सांगत असतात.

No comments:

Post a Comment