प्रसाद म्हणजे मनःशुद्धी,चित्तशुद्धी,
भावशुद्धी',आत्मबोध.
प्रसाद म्हणजे जागृती.
प्रसादाने येते प्रसन्नता
प्रसादासाठी करावे लागतात प्रयत्न,
प्रसन्न करावे लागते भगवंताला.
तो जेव्हां संतुष्ट होतो
पाहून आपले प्रयत्न.
जीवापाचे प्रेम प्रचितीला येते तेव्हां
तेव्हांच तो प्रसन्न होतो,प्रसाद देतो.
तीच त्याची कृपा.तेच त्याचे छत्र.
त्या कृपाछत्राखाली
निश्चिंत असतो साधक.
योग क्षेम त्याचा तोच चालवतो.
प्रसाद आळशाला मिळत नसतो
त्यासाठी सातत्याने करावे लागते
स्मरण त्याचे.
त्याचे शुभदर्शन होताच
अशुभाचा,अशुचीचा नाश होतो.
सर्वत्र शुभाचीच उपलब्धी !अस्तित्व.
कुठंच नसतं
अशुभ,अशोभनीय वा अशुचित्व..
भावशुद्धी',आत्मबोध.
प्रसाद म्हणजे जागृती.
प्रसादाने येते प्रसन्नता
प्रसादासाठी करावे लागतात प्रयत्न,
प्रसन्न करावे लागते भगवंताला.
तो जेव्हां संतुष्ट होतो
पाहून आपले प्रयत्न.
जीवापाचे प्रेम प्रचितीला येते तेव्हां
तेव्हांच तो प्रसन्न होतो,प्रसाद देतो.
तीच त्याची कृपा.तेच त्याचे छत्र.
त्या कृपाछत्राखाली
निश्चिंत असतो साधक.
योग क्षेम त्याचा तोच चालवतो.
प्रसाद आळशाला मिळत नसतो
त्यासाठी सातत्याने करावे लागते
स्मरण त्याचे.
त्याचे शुभदर्शन होताच
अशुभाचा,अशुचीचा नाश होतो.
सर्वत्र शुभाचीच उपलब्धी !अस्तित्व.
कुठंच नसतं
अशुभ,अशोभनीय वा अशुचित्व..
No comments:
Post a Comment