परीक्षणाचा जन्म होतो.आत्मपरीक्षणातून स्वभाव दोष दिसू लागतात.
स्वभाव दोष जसजसे दूर केले जातात तसतसे चित्तशुद्ध होऊ लागते.
चित्त शुद्धी झाली की आत्म दर्शन होते.
स्वतःचं निरीक्षण अलिप्त होऊन करता यायला हवं.लिप्ततेमुळे नको
त्या ऊर्मींना प्राधान्य दिलं जातं.त्या ऊर्मीतून जे विचार जन्माला येतात त्या-
तून होणारी कृती तारक होऊ शकत नाही. कृतीचं विकृतीत न कळत रूपां-
तर होऊ लागतं व माणसाचं हंसं होतं.पण तो मात्र समजतो की मी करतो
तेच योग्य आहे.त्यामुळे वरवरचं समाधान मिळतं.त टिकाऊ नसतं.त्याचा
अहं मात्र सुखावतो.मी जगा वेगळाअसून माझं व्यक्तिमत्व भारदस्त अस-ल्याचं त्याचं मत पक्कं होत जातं.त्यातून इतरांना आपल्यापेक्षा कमी लेख-
ण्याची वृत्ती जागृत होते.इतरांना कमी लेखण्याने ते दुखावतात व त्याच्या
पासून दुरावतात.
वास्तविक प्रत्येकजणच जगा वेगळाअसतो.प्रत्येकाचं अस्तित्व आगळं वेगळं असतं.आकार,रंग, रूप यात थोडं फार साम्य असलं तरी
अंतरंगातले रंग प्रत्येकाचे वेगवेगळे असतात त्यामुळे माझंच व्यक्तिमत्व
भारदस्त हा निव्वळ भ्रम असतो,भास असतो हे समजायला जितका
उशीर होतो तितका माणूस अप्रिय होत जातो.जसजसे हे सत्य त्याला
उमगते तसतसी त्याची वागणूक बदलते त्याच्या वृत्ती विचार व कृती-
मधील विखार दूर होतो.