:-) ... भावतरंग-मनाची स्मृति शक्तीच दुःखःदायक असते. एकटा बसलोय.मनात खूपखूप विचार येताहेत.सर्वच आठवणी.गत काळातील घटनांचे पडसाद.गेले दिवस निघून गेले.झाल्या गोष्टी घडून गेल्या. मनात मात्र अजूनही ठाण देऊन आहेत.जणु काल सगळं घडलं असं वाटतं . मनाची स्मृतिशक्तीच खरं म्हणजे दुःख दायक असते.विसरणं म्हणजे घटनेचा सारा तपशील पुसला जाणं पण तसं होत नाही . कुणी लावलेला बोल,कुणी केलेला अपमान,कुणी केलेली निंदा नालस्ती,सारं सारं मन साठवून ठेवतं. माणूस जेव्हां एकटा असतो तेव्हां कुठला तरी एक पापुद्रा उचकटला जातो.अचानक.त्याला नेमकं काही कारण असतंच असं नाही. एकदा का मनस्तरंग उठायला लागले की त्यांना अंत नसतो. माणसाचं पूर्वायुष्य उत्तरायुष्याच्या विश्रांतीच्या वेळी त्याला सारखं डिंवचत असतं. असं का? असंच कसं घडलं? असंच का घडलं?तेही फक्त माझ्याच बाबतीत? हीच का नियती?,प्रारब्ध?प्राक्तन? पूर्वायुष्याचं फलित? आपल्या हातून कळत नकळत घडलेल्या चुका केव्हां न केव्हां माणसाला छळत असतात.
No comments:
Post a Comment