Monday, 10 April 2017

भावतरंग ---अस्तित्वाचा प्राण- चैतन्य

... भावतरंग--अस्तित्वाचा प्राण--चैतन्य खरं म्हणजे स्वतःच्या अंतरंगाचा अंतही लागत नाही व रंगही कळत नाही. अंतरंगात इतके विविध तरंग उठतात. त्यांची गणना करणे अशक्यच नव्हे तर. दुस्तरअसतं.तरीही ज्यांनी ज्यांनी अंतरात्म्याचा शोध घेण्यासाठी आपलं जीवन कामी लावलं त्यांनी जी वाट चोखाळली ती प्रत्येकाची स्वतंत्र आहे .म्हणूनच ध्यानाच्या विविध पद्धती अस्तित्वात असाव्यात.कुणाला केव्हां कशी उपरती होईल हे सांगता येत नाही.उतरती झाल्यावर तो जी वाट चोखाळतो ती त्याची स्वतःची असते. मार्गदर्शक फक्त वाटेचा निर्देश करू शकतो. चालावं तर स्वतःलाच लागतं दिशा दिग्दर्शन एवढंच मार्गदर्शकाचं काम असतं.बोट धरून तो ईप्सिता पर्यंत नेऊ शकत नाही.त्याला त्याचं ईप्सित प्राप्त झालेलं असतं.आपलंही तेच ईप्सित असेल असं नाही. चैतन्याचा स्रोत अविरत वाहात असतो.जन्मापूर्वीही त्याचं अस्तित्व असतं,मृत्यूनंतरही ते अस्तित्व अबाधित असतं असं ज्यांनी जाणलं त्यांचं म्हणणं आहे.त्यालाच ते आत्म शक्ती ,परमात्म शक्ती म्हणतात.आत्म्याचा शोध म्हणजे अस्तित्वाचा शोध,अस्तित्वाचा आधार -नव्हे प्राण! तेच चैतन्य.ते चराचरात भरलेलं आहे. जड वस्तूत ते सुप्तावस्थेत असतं एवढंच अन्यथा अणुतून भयानक विस्फोट झाले नसते.ते होतात म्हणजे ते अणूत सुप्तावस्थेत असतात. मनाची शक्ती अगाध आहे.संकल्पातून निश्चयात्मक वृत्ती जागृत होतात. त्यांच्याशी प्रामाणिक राहून वाटचाल केल्यास गन्तव्याप्रत पोहोचता येते.

No comments:

Post a Comment