Wednesday, 12 April 2017

भावतरंग-पतनाचं कारण अहंकार

. .भावतरंग-पतनाचं कारण अहंकार स्वप्नपूर्तीचा आनंद वेगळा असतो.केवळ स्वप्न पाहून स्वप्नपूर्ती होत नाही. स्वप्नपूर्तीसाठी खडतर प्रयत्न करावे लागतात.स्वप्नपूर्तीचा संकल्प दृढ असा- यला हवा.संकल्पाच्या पूर्तीसाठी निश्चित दिशेने पावले उचलावी लागतात. पूर्ती नंतर थकवा पार दूर होतो.आनंदोर्मी उसळतात.या आनंदाला सीमा नसते.अर्थात हा आनंद क्षणिक असतो.पण तो सहसा विस्मृतीत जात नाही. पुन्हा नवे स्वप्न माणूस पाहू लागतो व त्याच्या पूर्तीसाठी धावत राहातो.स्वप्ना- मागून स्वप्नपाहायची माणसाला हाव असते. स्वप्नाचं लक्ष्य समृद्धी,उत्कर्ष,शक्ती संपादन,द्रव्यप्राप्ती इत्यादी असतात. स्वप्न पूर्ण होण्यासाठी अनेकांचे हातभार लागावे लागतात. जनसंपर्क दांडगा असावा लागतो.निरलस,निस्वार्थपणे जनसेवा करावी लागते.सर्व सामान्यांच्या हृदयात स्थान मिळवावं लागतं.त्यासाठी त्यांची सेवा निरंतर करावी लागते.एकदा जनतेच्या हृदयावर आरूढ झालात की आपोआप सत्तेची खुर्ची वश होते.ती मिळाली की अहंकार वाढतो वतोच पतनाला कारण होतो. अहंकार माणसाला क्रूर बनवतो.त्याची सत्ता सेवेसाठी राहात नाही. तो स्वार्थी बनतो.केवळ स्वार्थच त्याचं लक्ष्य असतं. त्यामुळे तो समृद्ध होतो.पण ते ऐश्वर्य शापित असतं.अनेक शोषितांचे तळतळाट त्यात समाविष्ट असतात. शेवटी अशी काही आपत्ती अचानक येते की त्यातून सुटका होत नाही.

No comments:

Post a Comment