मी मी म्हणत म्हणत
सारं आयुष्य जातं
कोण मी? कुणाचा मी?
काही न कळता
सारं सारं संपतं
पै पै जोडून
महाल उभा होतो.
जोडा जोड
करता करता
उपभोग राहून जातो.
कुणाला न सांगता
जीव एकटाच निघून जातो.
इथले सारे सारे
इथेच राहाते.
मित्र,परिवार,
सगे सोयरे
स्मशाना पर्यंत
सोबत करतात.
अश्रू दोन ढाळून
मेलेल्याला
विसरून जातात.
No comments:
Post a Comment